आपण आंदोलन संपवलेलं नाही. लवकरच आंदोलन नव्या स्वरूपात सुरू केलं जाईल. सरकारने शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सिंग यांनी केला.
‘सरकारने राकेश टिकैतना मोठं केलं’
व्ही. एम. सिंग यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर नाशाणा साधला. ‘सरकारने टिकैत यांना मोठं केलं. एक व्यक्ती ज्याच्याकडे फक्त ३००-४०० लोक होते. बाकीचे आमचे लोक होते. संपूर्ण आंदोलन मागे घेतले गेले तर त्याचं श्रेय व्ही. एम. सिंग यांना जाईल. आणि हे आंदोलन सिंग यांच्या माणसांमुळे उभे आहे. यामुळे सरकारने टिकैत ना मोठं केलं, अशी टीका सिंग यांनी केली.
‘९ तासांचे फुटेज मिळाल्यावर ती व्यक्ती नेता होईलच’
एखाद्या व्यक्तीला ९ तासांचे फुटेज मिळाले तर तो नेता होईलच ना. हा संपूर्ण डाव २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे सरकार येऊ नये हा त्यामागचा हेतू आहे, असा आरोप सिंग यांनी केला.
‘मी आंदोलनाची बीज पेरलं’
शेतकरी आंदोलनापासून वेगळं झाल्यावर आपल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण माझा हेतू आंदोलन खराब करण्याचा नव्हता. कारण मीच आंदोलनाचं बीज पेरलं होतं. मी घेतलेला प्रत्येक निर्णय नैतिकतेवर आणि राष्ट्रीय हितावर आधारित होता. आता दिल्लीच्या सीमेवर जे काही आंदोलन सुरू आहे ते राजकीय बनलं आहे. आता कॉंग्रेस, राष्ट्रीय लोकदल आणि आम आदमी पक्षासह अनेक पक्षांचे नेते खुलेआम बोलू लागले आहेत. मी तिथे असताना कुठलाही राजकीय नेता मंचावरून बोलू शकत नव्हता. आता प्रत्येकजण मंचावर असून सर्व काही राजकीय होत आहे. पाठिंबा देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि उघडपणे समोर येणं वेगळी गोष्ट आहे, असं सांगत व्ही. एम. सिंग यांनी सरकारसह राकेश टिकैत यांच्यावर हल्ला चढवला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times