पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारनवरे यांचे अनेक नातेवाइक कुही भागात राहातात. शनिवारी सायंकाळी तिघे मोटरसायकलने अंभोऱ्यातील मंदिराजवळ आले. त्यानंतर त्यांनी वैनगंगा नदीत उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शीला मोटरसायकल तेथे उभी दिसली. त्याने वेलतूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
रात्र झाल्याने पोलिसांना मृतदेह शोधण्यात अडचणी येऊ लागल्या. रविवारी सकाळी पोलिसांनी नदीत मृतदेह शोधण्यास सुरू केली. दुपारच्या सुमारास पोलिसांना तिघांचे मृतदेह आढळले. मृतदेहांचीओळख देखील पटली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तिघांनीही एकमेकांचे हात ओढणीने बांधले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत काही दिवसांपासून श्याम तणावात होते,अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times