नागपूर: अंभोऱ्यातील वैनगंगानदीत ( in ) १२ वर्षीय मुलीसह दाम्पत्याने उडी घेऊन केली (). ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), त्यांच्या पत्नी सविता (वय ३५) व मुलगी समता (वय १२ तिन्ही रा. अनमोलनगर,वाठोडा), अशी मृतकांची नावे आहेत. श्याम हे संत जगनाडे कॉपरेटिव्ह सोसायटीत लेखापाल, तर समता ही सहाव्या वर्गात शिकत होती. तर, सविता या गृहिणी होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारनवरे यांचे अनेक नातेवाइक कुही भागात राहातात. शनिवारी सायंकाळी तिघे मोटरसायकलने अंभोऱ्यातील मंदिराजवळ आले. त्यानंतर त्यांनी वैनगंगा नदीत उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शीला मोटरसायकल तेथे उभी दिसली. त्याने वेलतूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

रात्र झाल्याने पोलिसांना मृतदेह शोधण्यात अडचणी येऊ लागल्या. रविवारी सकाळी पोलिसांनी नदीत मृतदेह शोधण्यास सुरू केली. दुपारच्या सुमारास पोलिसांना तिघांचे मृतदेह आढळले. मृतदेहांचीओळख देखील पटली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

तिघांनीही एकमेकांचे हात ओढणीने बांधले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत काही दिवसांपासून श्याम तणावात होते,अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here