कराड: पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तर, या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील तीन पैलवानांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. हे तिघेही कात्रज परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन कार मध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात कराड जवळच्या आटके टप्पा येथे महामार्गावर झाला. अपघातातील एक कार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात होती. त्या दरम्यान पाठीमागून वेगात आलेल्या कारने पुढे असणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेने पुढील कार उलटली.

क्लिक करा आणि वाचा-

या भीषण अपघातात दोन्ही कारमधील मिळून चार जण मृत्युमुखी पडले आहेत. तर जखमींवर कराडच्या कृष्णा हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here