म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनासोबत सरकारचा ऐतिहासिक करार झाला आहे. त्यामुळेच ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे करोनाने आश्वासन दिले आहे, असे ट्वीट करत मनसेचे नेते यांनी रविवारी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ( Leader attacks Thackeray Government over Restrictions on Local Tain Travelling)

वाचा:

लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरून देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘खुशखबर… करोनाबरोबर सरकारचा ऐतिहासिक करार… ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे करोनाचे आश्वासन… जगभरातल्या डॉक्टरांना जमले नाही ते कम्पाउंडरने करून दाखवले… अभिनंदन!’ असे देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. सोमपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र वेळेचे बंधन असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा:

दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची लाइफलाइन १५ डिसेंबर आणि त्यानंतर १ जानेवारीपासून पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलली होती. मात्र दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांत करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबई महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली. त्यामुळे लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. नव्या वर्षातील करोनाच्या रुग्णसंख्येवर नजर ठेवायची आणि त्यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी भूमिका मुंबई महापालिकेने घेतली होती. त्यामुळे जानेवारी महिना उलटेपर्यंत लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र आता फेब्रूवारीपासून लोकल सुरू करण्यचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here