शरजीलवर कारवाई करुन त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपनं केली आहे. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्रही लिहलं आहे. मात्र, शरजीलवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आता योगी सरकारकडे शरजीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाचाः
‘हिंदू समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्या शरजील उस्मानीवर चाप बसवण्यासाठी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, ही खात्री असल्यामुळं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे,’ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
वाचाः
काय लिहलंय पत्रात?
‘अलीगढ विद्यालयातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यानं ३० जानेवारी २०२१ मध्ये पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ‘आजचा हिंदू समाज सडका आहे’, अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य त्यानं केलं होतं. त्याचबरोबर, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशापद्धतीचे त्याची वक्तवे होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील संविधानाक संस्थांबाबत अशापद्धतीची वक्तव्ये राष्ट्रदोहाच्या गुन्ह्यासमान आहेत, या विधानांमुळं महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचाः
‘शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील सिधारी भागातील स्थानिक रहिवाशी आहे. त्यानं केलेल्या अक्षेपार्ह विधानांना आता ५ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकार त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही अशी राज्यातील जनतेला खात्री आहे,’ असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
‘उत्तर प्रदेश पोलिसांनी लवकरात लवकर शरजील इमामविरोधात एफआयआर दाखल करुन त्याला अटक करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, ‘हिंदू सामाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी,’ असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times