मुंबई: वरील लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु, ब्रिटन, ब्राझिलमध्ये ज्या पद्धतीने फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनावरील सादरीकरणावेळी सांगितले. ( Latest Update )

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावे. सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन पसरले असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल.’

वाचा:

करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु केले असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे, असे नमूद करतानाच केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथील केले असले आणि महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी राज्यात सरसकट सगळे निर्बंध उठविले जाणार नाहीत व काळजीपूर्वकच आपण पुढे जाणार आहोत, असे स्पष्ट संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिले. अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत. याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे, पण आणखी एकदा विनंती करून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे असे सांगणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

वाचा:

दुसऱ्या स्ट्रेनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी माहिती देताना सांगितले की, ब्रिटनमध्ये २० जानेवारी या एकाच दिवशी करोनाने १८२० मृत्यू झाले आहेत. ब्राझिलमध्ये दररोज करोनामुळे १ हजार मृत्यू होत असून दरदिवशी ५० हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार पाच महिन्यानंतर करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो ७० टक्के जास्त संसर्ग पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर ४० टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात, इतका धोकादायक आहे असे आढळल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

साडेतीन लाख जणांना दिली लस

आतापर्यंत महाराष्ट्राला १८ लाख २ हजार कोव्हिशिल्ड, तर १ लाख ७० हजार ४०० कोव्हॅक्सिन अशा १९ लाख ७२ हजार ४०० लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कोव्हिशिल्ड तर ३ हजार ५४५ कोव्हॅक्सिन लसी आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बुधवारपासून फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यास सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी झाला

राज्याचा मृत्यू दर नोव्हेंबरमध्ये २.२६, डिसेंबर मध्ये १.९६ आणि जानेवारीत १.६३ टक्के इतका झाल्याची तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ४.५१ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर २० लाख प्रवासी

लोकल सर्वांसाठी सुरु केल्यावर २० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर तर १४ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले, अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांना केंद्र सरकारने १०० जणांच्या उपस्थितीस परवानगी दिली असली तरी आपल्याकडे अजूनही ५० जणांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी अजूनही २० जणांनाच परवानगी आहे. त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ७५ टक्के उपस्थितीच्या अटींशिवाय सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here