मालदा, पश्चिम बंगालः भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ( ) शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( ) यांच्यावर हल्लाबोल केला. आपला अहंकार जपण्यासाठी ममता बॅनर्जींनी राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित केल्याचा आरोप नड्डांनी केला. ‘जय श्रीराम’ च्या घोषणेने ममतादीदींना इतका संताप का येतो? असा सवालही नड्डांनी केला. पक्षाच्या ‘कृषक सुरक्षा अभियान’ च्या शेवटच्या टप्प्यात नड्डांनी उपस्थिती लावली. विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने ‘नमस्ते आणि टाटा’ म्हणण्याचं निश्चित केलं आहे, असं नड्डा म्हणाले.

ममतादीदीने पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला, असा आरोप नड्डा यांनी केला. आपला अहंकार जपण्यासाठी ममतांनी ही कल्याणकारी योजना लागू होऊ दिली नाही. आता बंगालच्या शेतकऱ्यांमधून ही योजना लागू करण्याची मागणी होऊ लागली, तेव्हा ममता बॅनर्जींनी ती लागू करणार असल्याची घोषणा केली. ७० लाख शेतकरी दोन वर्षांसाठी वार्षिक सहा हजार रुपयांपासून वंचित आहेत, असा आरोप नड्डांनी केला.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मालदामधील शाहपूर गावात ‘शेतकरी सुरक्षा सह-भोज’मध्ये शेतकऱ्यांसोबत जेवण देखील केलं. त्यांनी खिचडी आणि भाजी देण्यात आली. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला घडलेल्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधलं. आपण आलो त्यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. पण या घोषणा ऐकून ममता बॅनर्जी का संतापल्या हे कळत नाही?, असं नड्डा म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामधील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या गेल्या. यानंतर ममता बॅनर्जींनी भाषण करण्यास नकार दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here