नवी दिल्ली: करोना व्हायरसची लागण झालेल्या चीनमधून येणाऱ्या भारतीयांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी () नवी दिल्लीच्या छावला कँम्पमध्ये सुरू केलं आहे. ६०० बेडच्या या वॉर्डमध्ये चीनमधून येणाऱ्या भारतीयांची तपासणी करण्यात येणार आहे.

चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादूर्भाव झाला आहे. या शहरात शेकडो भारतीय राहत असून जीवाच्या भीतीने या भारतीयांनी कुटुंबकबिल्यासह भारतात येण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयटीबीपीने या लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी आयसोलेशन सेंटर उभारले आहे. विशेष करून महिला आणि लहान मुलांवर या आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. एकूण ६०० बेडचं हे भलं मोठं आयसोलेशन सेंटर असून या सेंटरमध्ये डॉक्टरांची एक विशेष टीमही तैनात करण्यात आळी आहे. या सेंटरमध्ये औषधांचा मुबल साठा ठेवण्यात आला आहे. तसेच या सर्वांच्या तपासणीसाठी आवश्यक त्या वैद्यकीय उपकरणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये राहण्याची, खाण्याची आणि वायफायची व्यवस्था करण्यात आली असून वुहान येथून आलेल्या प्रवाशांच्या देखभालीसाठी कर्मचारी वर्गही तैनात करण्यात आला आहे.

उद्या शनिवारी सकाळपासूनच वुहान येथून भारतीयांचं नवी दिल्लीत आगमन सुरू होण्याची शक्यता आहे. विमानतळावर प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यानंतर या लोकांना तात्काळ आयटीबीपीच्या सेंटरमध्ये नेण्यात येईल. तिथे या सर्वांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी होईल. त्यासाठी सफदरजंग हॉस्पिटलचे डॉक्टरांची टीमही मदत करणार आहे. दरम्यान, करोना व्हायरसने आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांचा बळी घेतल्याने चीनमध्ये या व्हायरसची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हा संसर्गामुळे होतो. त्यामुळेच या रोगाची लागण झपाट्याने होत असल्याचं वैद्यकिय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हवा आणि श्वासोच्छवासाद्वारे करोना व्हायरसची एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तिला लागण होते. लोक अर्ध कच्चं मांस खात असल्यानेही हा व्हायरस फैलावत असल्याचं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here