मुंबई: राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री यांनी आज बैठक घेतली. पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत नोंदविलेल्या निरीक्षणाच्या अनुषंगाने व विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ( Latest Update )

वाचा:

वर्षा येथील समिती कक्षात ही बैठक झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्यमंत्री आणि केंद्रीय पथकातील सदस्य तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.

वाचा:

केंद्रीय पथकाकडून आढावा घेतल्यानंतर मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे करोनाच्या नवीन रुग्णसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र शहरी भागापेक्षा नंदुरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

वाचा:

आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले, पथकाने ज्या भागातील पॉझिटिव्हीटी दर जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्याची दखल घेऊन तेथील हा दर कमी करण्यासाठी लक्ष केंद्रीत करू. या भागातील रुग्णांची जिनॉमिक सीक्वेन्सची तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील. टास्क फोर्सच्या माध्यमातून डॉक्टरांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात यावे त्याचबरोबर डेथ ऑडिट कमिटीचे कार्यही प्रभावीपणे करण्यात यावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय पथकाने नोंदवले ‘हे’ निरीक्षण

देशात असलेल्या एकूण सक्रिय करोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून या भागातील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here