नागपूर: राज्याचे कल्याण मंत्री (Vijay Vadettiwar) यांना उपमुख्यमंत्री (Ajit Pawar)यांनी टोला लगावला आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते. वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘भाषणामध्ये बोलण्याच्या नादात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. पण ज्या पक्षाकडे बहुमत असते त्यांचाच प्रमुख असतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ( gives reply to state made by )

पवार नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांनी जालन्यातील ओबीसी महामोर्चावेळी केलेल्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, आपण ज्या समाजातून पुढे येतो त्या समाजाच्या मेळाव्यात अशा प्रकारच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या जातात. मेळाव्यात टाळ्या वाढत असताना एखादे जादा वाक्य बोलले जाते. मात्र, जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेता हाच प्रमुख असतो. तरीही विजय वडेट्टीवार यांच्या विचाराला आमच्या शुभेच्छा आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी ही मागणी सतत करण्यात येत आहे. ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात जालन्यात ओबीसी महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी या मोर्चामध्ये ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स पाहायला मिळाले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here