मुंबई: ‘पंतप्रधान हे एकीकडं विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात आणि दुसरीकडं त्यांचं कौतुकही करतात. त्यांचं राजकारण नव्या पिढीनं अभ्यासावं असंही सांगतात. मोदींच्या या भूमिकांवर आपण काय बोलू शकतो? खरे मोदी कोण हे आता त्यांनाच विचारायला हवं,’ असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी आज हाणला.

वाचा:

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज संपला. त्यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. आझाद यांना निरोप देताना मोदींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केलं. आझाद हे स्वत:च्या प्रतिमेपेक्षा सभागृह आणि देशाला प्राधान्य देणारे नेते आहेत. आझाद यांच्याशी माझे नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत. मित्र म्हणून त्यांचा खूप आदर करतो, हे सांगताना मोदी भावूक झाले होते. आझाद यांच्याबद्दल बोलताना त्यांनी यांचंही कौतुक केलं.

वाचा:

मोदींच्या या भाषणाबद्दल आणि पवारांच्या केलेल्या कौतुकाबद्दल विचारलं असता भुजबळ यांनी खास शैलीत टिप्पणी केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारसाहेबांवर टीका सुद्धा करतात. त्यांनी यू टर्न घेतल्याचंही बोलतात आणि त्यांच्याशी युती करायला सुद्धा तयार असतात. यावर मी काय बोलणार? आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलंय की, मोदी राज्यसभेत बोलताना गहिवरले. त्यामुळं हे खरे की ते खरे असा प्रश्न मला पडलाय. खरे मोदी कोण हे आता त्यांनाच विचारायला हवं, असा चिमटा भुजबळांनी काढला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here