सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पटेल म्हणाले, ‘शरद पवार हे स्वत’ला शेतकऱ्यांचा आत्मा समजतात, मग कृषी विधेयकावरील चर्चेदरम्यान ते राज्यसभेत गैरहजर का होते ? ते गैरहजर राहण्यामागे काय चमत्कार घडला, नेमकी काय भानगड आहे ? कृषी कायद्यावरुन सध्या राजकारण सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागे शेतकरी आहेत का?, सदाभाऊ खोत फुटले नसते तर ते भाजपसोबत असते. तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेईमान कसा ? अशी विचारणाही पटेल यांनी केली. राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती असा टोलाही त्यांनी लगाविला.
पटेल म्हणाले, ‘ केंद्र सरकार सगळया गोष्टीवर चर्चा करायला तयार आहे. पण शेतकरी आंदोलनातील नेते मंडळी आडमुठेपणाने वागत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. हे आंदोलन शेतकऱ्यांचे हिताचे राहिलेले नाही. त्यामध्ये राजकारणाचा शिरकाव झाला आहे. ही राजकीय मंडळी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आंदोलनाचा तमाशा करत आहेत. कृषी कायद्यावरुन विरोधक मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हा कायदा ऐच्छिक आहे. ’
क्लिक करा आणि वाचा-
पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times