अर्थमंत्री म्हणाल्या…
देशातील ४ रेल्वे स्थानकांची पुनर्विकास होणार
रेल्वे रुळांलगत सौरऊर्जा ग्रीड बसवणार
एकूण १५० गाड्या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे सुरू होणार
तेजससारख्या अनेक ट्रेन सुरू केल्या जाणार
१४८ किमी बेंगळुरू उपनगरीय ट्रेन सिस्टम तयार करणार, केंद्र सरकार यासाठी १५ टक्के निधी देणार
या निर्णयांती अंमलबजावणी करण्यासाठी १८ हजार ६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
काय होत्या अपेक्षा?
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेला मिळणाऱ्या आर्थिक मदतीत १० ते १५ टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या व्यतिरिक्त, रेल्वेमध्ये खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक निर्णयांची घोषणा होतील अशीही आशा व्यक्त करण्यात येत होती. या बरोबरच ५० रेल्वे स्थानकांवर खासगी कंपन्यांच्या मदतीनं जागतिक दर्जाच्या सोई-सुविधा देण्याची घोषणा होईल, अशीही अपेक्षा व्यक्त होत होती.
या वेळी रेल्वेने अर्थ मंत्रालयाकडे सुमारे १ लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय मदत मागितली, मात्र अर्थ मंत्रालय रेल्वेला ७५ हजार कोटी रुपये ते ८० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या वेळी अर्थसंकल्पात रेल्वेत खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलमध्ये अनेक प्रकारचे बदल होण्याचीही शक्यता आहे. यामुळे रेल्वेतील खासगी गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा आहे.
‘तेजससारख्या आणखी ट्रेन धावणार’
सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकूण ११५० ट्रेन धावणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. विशेष म्हणजे तेजस सारख्या आणखी काही ट्रेन्स पर्यटन स्थळांशी जोडल्या जातील अशी महत्त्वपूर्ण घोषणाही सीतारामन यांनी केली.
गेल्या अर्थसंकल्पात काय मिळाले?
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेला ६५,८७३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय सहायता देण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times