प्रेमसंबंधातून पुण्यातील तरुणीने आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात येत आहेत, असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी, ‘आत्महत्या झाल्यानंतर त्याची चौकशी पोलीस करत असतातच. या प्रकरणातही चौकशी होईल. चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ‘आता काही पक्षांना दुसरं काही काम नसल्यानं असे आरोप कराताहेत,’ असा टोलाही विरोधी पक्षाला हाणला आहे.
‘मुंबईतही धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार मागे घेतल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे,’ असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यावेळेस त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडलं होतं का?, असे बरेच काही त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. धनंजय मुंडेंचं प्रकरण आता मिटलं आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
वाचाः
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times