म. टा. प्रतिनिधी, नगर: चुरशीच्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मोठ्या कार्यक्रमात शपथविधी होण्याच्या घटना आता नवीन राहिल्या नाहीत. असाच एक जंगी सोहळा चक्क सरपंच आणि सदस्यांच्या पदभार स्वीकारण्यासाठी झाला. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला या गावाच्या सरपंचाने हेलिकॉप्टरमधून येत भव्य कार्यक्रमात सदस्यांसह गावाच्या कारभाराची सूत्रे स्वाकारली. या जंगी सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक कंपन्या आहेत. ते पुण्यातच राहतात. मात्र, गावाशी त्यांचा संपर्क असतो. अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावात विविध कामेही त्यांनी केली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचे त्यांशी चांगले संबंध आहे.

वाचाः

यावेळी त्यांनी गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. या माध्यमातून गावाचा विकास करू, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनाही ते पटले असावे. त्यांनी बहुमताने त्यांच्याकडे सत्ता सोपविली. सरपंचरदाचे आरक्षणही सोयीचे निघाले. त्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

वाचाः

आज त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यासाठी गावात मोठा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी ते पुण्याहून हेलिकॉप्टरने आले. गवकऱ्यांनी आपल्या लाडक्या सरपंचाचे जल्लोषात स्वागत केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसारखा भव्य सोहळा या निमित्त गावकऱ्यांना पहायला मिळाला. यामध्ये सरपंच आणि सदस्यांनी कोणताही भेदभाव न करता, राजकारण न करता गावचा विकास करू, अशी शपथ घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here