वाचा:
चोपडा येथील या कार्यक्रमात व्यासपीठावर चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, चंद्रहास गुजराथी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आदी उपस्थित होते.
वाचा:
मंत्री जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की, गेल्या ४० वर्षांत देशात खूप मोठे बदल झाले आहेत. ज्या ठिकाणी लोक चालत होते, सायकलवर होते. तेच लोक कारमध्ये आले आहेत. देशात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक काळ राज्य केले आहे. आमचे विरोधक सांगतात की यांनी देशात काय केले? गेल्या काळात देशात जी स्थित्यंतरे घडली, तो बदल म्हणजेच आमचे काम आहे.
वाचा:
सर्वपक्षीयांकडूनच चोपड्यात विकास: गुजराथी
चोपडा नगरपालिकेच्या वतीने आज सामाजिक सभागृहाचे उद्घाटन होत आहे. या निमित्ताने शहराच्या वैभवात भर पडली आहे. आजवर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. सर्वपक्षीयांना सोबत घेऊन याठिकाणी विकास होत आहे. निधीचा उपयोग सत्कारणी लागावा, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगत अरुण गुजराथी यांनी चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times