भूकंपाचे धक्के फक्त भारतातच नव्हे तर शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही जाणवले. ताजिकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. काही मिनिटातच तिथे भूकंपाचे २ धक्का बसले आणि हे धक्के बराच काळ जाणवले.
२४ तासांत दुसर्यांदा भूकंप
राजस्थानच्या बीकानेरमध्ये आज ४.३ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू बीकानेरच्या वायव्येकडे ४२० किलोमीटर अंतरावर होते. हा भूकंप भारतीय वेळेनुसार सकाळी ८.०१ वाजता झाला.
भारतीय उपखंडात विनाशकारी भूकंप यापूर्वी झाले आहेत. २००१ च्या गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत दरवर्षी सुमारे ४७ मिलिमीटरच्या वेगाने आशियाला धडकत आहे. टेक्टॉनिक प्लेट्स धडकल्यानंतर भारतीय उपखंडात वारंवार भूकंप होत असतात. भूगर्भातील पाण्याच्या कमतरतेमुळे टेक्टॉनिक प्लेट्स धडकण्याचा वेग कमी झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times