म.टा. प्रतिनिधी,

‘मुलांनो, आम्हाला माफ करा’, अशी चिठ्ठी लिहित दाम्पत्याने आत्महत्या केली. ही घटना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड बस स्थानकाजवळील परिसरात उघडकीस आली.

वाचा:

राजू सोहनलाल गुप्ता (वय ६०) आणि संध्या राजू गुप्ता (वय ५५) अशी या मृत व्यक्तींची नाव आहेत. राजू यांचे शहरातील नंदनवन परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही विविध आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांचा औषधांवरील खर्च वाढला होता. आजारपण आणि औषधांसाठीचा खर्च यामुळे दोघेही नैराश्यात होते, असे कळते. त्यांचा मुलगा विक्की काही कारणाने शहरात आला होता. यावेळी दोघेही घरी एकटेच होते. दोघांनी विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. आजारपण आणि वाढता आर्थिक ताण याला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here