पुणे: बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी () राज्यातील राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा लावून धरत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी चौकशी मागणी करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी या प्रकरणी () यांनी चौकशीचे आदेश देण्याची पुन्हा मागणी केली आहे. (chief minister uddhav thackeray should order an inquiry into the pooja chavan suicide case- )

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेत पाटील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यातील मंत्र्यांविरोधात अनेक तक्रारी येऊन देखील मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असून राज्य शासनाची संवेदनशीलचा संपली आहे का?, असा सवाल करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम दिलाच पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताकदीचा वापर करावा- पाटील
पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ताकदीचा वापर करून या प्रकणी तपास करण्याचे आदेस द्यावेत असे आवाहन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील पोलिस दबावाखाली असल्याचेही पाटील म्हणाले. महिन्याभराच्या काळात अनेकांनी आमच्याविरोधात धमक्या दिल्या, मात्र कोणीच काहीच केले नाही, असा तक्रारीचा सूरही पाटील यांनी लावला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी कालच केली होती. या तरुणीने आत्महत्या करुन अनेक तास उलटून गेले असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे, असे मांडतानाच राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आज त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here