शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास विरोध करतानाच पडळकर यांनी पवारांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, पडळकर आणि खोत यांची लायकी काय? लायकी नसताना त्यांनी पवारांसारख्या नेत्यावर बोलू नये. लायकी नसलेली माणसंच सध्या जास्त बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी हे फडणवीसच आहेत. सत्ता नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच केवळ बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहेत.
वाचाः
सत्ता गेल्याचे दु:ख फडणवीस यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी जाणवत असल्याचा आरोप करताना मुश्रीफ म्हणाले, हे आरोप थांबवले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
वाचाः
सध्या राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, याबाबत चौकशी सुरू आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी काहीही आरोप करून चालणार नाही. चौकशीत सर्व काही स्पष्ट होईल. चौकशीपूर्वीच आरोप करणे चुकीचे आहे. केवळ कुणाला तरी बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात काहीच अर्थ नाही.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times