सांगली: जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून भाजपचे विधान परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असा वाद गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच रंगला आहे. याच वादाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना सांगलीतील पत्रकार परिषदेत विचारले असता पाटील यांनी सडेतोड भाष्य केले. या पत्रकार परिषदेला पडळकर उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहत तिथेच चंद्रकांतदादांनी त्यांना समज दिली. ( )

वाचा:

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याने व त्यांना विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री यांनी पडळकरांच्या जप्त झालेल्या डिपॉझिटचा उल्लेख करत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. या वादात उडी घेत आज चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांचे कान पकडले पण त्याचवेळी पवारांनाही लक्ष्य केले.

वाचा:

‘शरद पवारांमुळे धनगर समाजाने खूप मोठे नुकसान सहन केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा रोष आहे. मागेही गोपीचंद पडळकर हे पवारांवर बोलल्यानंतर यांनी त्यांना पंढरपूर मध्ये बोलवून समजावून सांगितले होते. आता आम्ही त्यांना जाहीरपणे सांगतो की, त्यांचा जो रोष आहे तो त्यांनी जरूर व्यक्त करावा, जे बोलायचे आहे तेच बोलायचे असते, पण नीट बोलायचे असते’, असे पाटील यांनी बजावले. शरद पवारही अशाप्रकारे अनेक लोकांना तीरकसपणे बोलत असतात, हे पुढे बोलायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर शरद पवारांकडून आलेल्या प्रतिक्रियेबद्दल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here