चेन्नई, : सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही तिसऱ्या पंचांचा रोहित शर्माबाबतचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या डावात रोहित शर्मा फलंदाजी करत होता. त्यावेळी १३व्या षटकात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. मोईन अलीच्या षटकातील एक चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला होता. त्यावेळी इंग्लंडच्या संघाने पायचीतचे अपील केले होते. पण मैदानावरील पंचांनी हे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता.

तिसऱ्या पंच यावेळी व्हिडीओ पाहत असताना रोहितने आपली बॅट ही पॅडच्या मागे ठेवली होती. याचा अर्थ रोहित कोणताही फटका मारण्याच्या तयारीत नव्हता. व्हिडीओमध्ये चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता, त्याचबरोबर चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेरच पॅडवर लागला होता. त्यावेळी तिसऱ्या पंचांना वाटले की रोहित शॉट खेळत आहे. कारण तुम्ही जेव्हा शॉट खेळत नसता आणि चेंडू पॅडवर आदळून स्टम्पवर जात असतो तेव्हा फलंदाजाला बाद घोषित केले जाते. पण रोहित यावेळी कोणताही शॉट खेळत नव्हता. त्यानंतर जेव्हा रोहितला याबाबत विचारले तेव्हा आपण शॉट खेळत नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी रोहित २१ धावांवर खेळत होता. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयानंतर इंग्लंडचे खेळाडू निराश झालेले पाहायला मिळाले.

पहिल्या दिवशीही रोहित आणि अजिंक्यबाबतचे निर्णय ठरले होते वादग्रस्त…पहिल्या डावातील ७१व्या षटकात जॅक लिचच्या गोलंदाजीचा सामना करत असताना रोहित फसला. त्यामुळे चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्याने स्टम्पिंग केले. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने जोरदार अपील केली. त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी व्हिडीओमधील फुटेजमध्ये असे पाहायला मिळाले की, रोहितचा पाय हा जेव्हा स्टम्प उडवण्यात आले होते. तेव्हा क्रीझच्या लाइनवर होता. जर फलंदजाचा पाय लाईनवर असेल तर त्याला बाद देण्यात येते. पण तिसरे पंच अनिल शर्मा यांनी रोहितला यावेळी नाबाद दिले आणि इंग्लंडचे खेळाडू निराश झाले होते.

रोहितनंतर रहाणेबबतचा असाच एक तिसऱ्या पंचांना निर्णय वादग्रस्त ठरला. ही गोष्ट घडली तर ७५व्या षटकात. त्यावेळी जॅक लिचच्या गोलंदाजीचा सामना करत असताना अजिंक्य चकला. त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यावेळी मैदानातील पंचांनी अजिंक्यला नाबाद ठरवले होते. त्यावेळी इंग्लंडच्या संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता. तिसऱ्या पंचांनी यावेळी अजिंक्यची बॅट चेंडूला लागली की नाही, ते पहिल्यांदा तपासले. त्यावेळी अजिंक्यची बॅट ही चेंडूला लागलेली नव्हती. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी यावेळी पायचीतसाठी केले अपील तपासण्यासाठी गेले, त्यावेळी चेंडू हा लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी यावेळी अजिंक्य नाबाद असल्याचे सांगितले आणि मैदानावरील पंचांना आपला निर्णय कायम ठेवण्यास सांगितले. त्यावेळी इंग्लंडचे खेळआडू चांगलेच वैतागलेले होते. कारण त्यावेळी चेंडू हा अजिंक्यच्या ग्लोव्हजला लागला होता, असे इंग्लंडच्या खेळाडूंचे म्हणणे होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here