सांगली: कोथरूडमधील एका महिलेने मजबूत केलेल्या मतदार संघात जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे आयत्या बिळात नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ? अशी बोचरी टीका जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. तसेच चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरील टीका थांबवावी असे आवाहनही त्यांनी केले.

वाचा:

येथील भावे नाट्य मंदिरात जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात जाणारे स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि आदर्श शाळा उपक्रमाचा उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुण्यातील चांगले काम करणाऱ्या एका महिलेने कोथरूड मतदारसंघ मजबूत केला होता. माजी आमदार विकासकामांच्या जोरावर मतदार संघावर जोरदार पकड निर्माण केली. पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असे सांगणाऱ्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदार संघात निवडणूक लढवावी लागली. ज्यांनी मतदार संघात पकड निर्माण केली त्या मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून चंद्रकांतदादा यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत दादा हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ आहे. स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मतदारसंघ न मिळणे यावरून त्यांची जिल्ह्यातील ताकद काय आहे, ते दिसून येते,’ असं जयंत पाटील म्हणाले.

वाचा:

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका असल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पडळकर यांच्या बोलण्यातून भाजप किती खालच्या स्तरावर गेलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यामुळे वरिष्ठ नेते हताश झाले आहेत. त्यामुळे पक्षच नैराश्यात असल्याचे दिसत आहे. खालच्या स्तरावर जाऊन विरोधकांवर टीका केली जात असताना त्या पक्षाला काही वाटत नाही हे दुर्दैवी आहे. त्यांना पक्षाची चिंता वाटू लागली आहे. भाजप हा पक्ष कसा टिकवायचा अशी समस्या भेडसावत असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. प्रसिद्धीच्या मोहापायी राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर करण्यात येत आहे. चुकीचे बोलणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवारांवरील होत असलेली टीका थांबावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री दोषी असतील तरच कारवाई

पुणे येथे घडलेल्या पूजा चव्हाण या विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता, महाविकास आघाडीमधील मंत्र्यांच्या मागील दोन घटनांमध्ये काहीही तथ्य नव्हते. मंत्री राठोड यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे का हे खरे खोटे तपासले पाहिजे. मात्र, दोषी असतील तर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here