अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाने केवळ चित्रपटसृष्टीच नाही, तर देशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्र देखील ढवळून निघाले होते. त्यानंतर आता संदीप नाहरच्या मृत्यूबाबतचे वृत्त थडकल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. मात्र, संदीप नाहरने फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरून त्याने आत्महत्या केली असावी या वृत्ताला बळ मिळत आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून खात्री केल्यानंतर ते सिद्ध होणार आहे, असे चित्रपट क्षेत्र, तसेच सर्वसामान्यांमध्येही चर्चा ऐकू येऊ लागली आहे.
या व्हिडिओत संदीप आपण पत्नीच्या वागण्याला आणि परिस्थितीला कंटाळलो आहोत असे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘मला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. एम एस धोनी चित्रपटात मी छोटू भैयाची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. माझ्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत हा उद्देश आहे. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि याचे कारण माझी पत्नी कंचन शर्मा ही आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी धक्क्यात आहे. मी माझ्या पत्नीला समजावून थकलो आहे. ३६५ दिवस भांडण करणे. दररोज आत्महत्येबाबत बोलणे. ती म्हणते की मी मरेन आणि तुला अकडवेन.’
‘मी त्रस्त होऊन गेलो आहे. माझ्या कुटुंबाला ती शिव्या देते. माझ्या आईला शिव्या देते. मी तिच्यासमोर कुटुंबातील कोणाचाही फोन उचलू शकत नाही. माझे नाव कोणाशीही जोडते. माझ्यावर खूपच संशय घेते. संशयाला काही औषध नाही. सतत भांडत असते. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी पुन्हा शोधू लागलो. तिच्या आईची तिला साथ आहे. केस करण्याची धमकी देते.’
व्हिडिओ शेअर करत संदीपने लिहिले की, ‘#Suicide #note आता जगण्याची इच्छा नाही. आयुष्यात भरपूर सुख-दु:ख पाहिली. प्रत्येक समस्येला सामोरे गेलो, मात्र आज मी ज्या धक्क्यातून जा आहे तो सहन करण्यापलिकडचा आहे. मला माहीत आहे की आत्महत्या करणे हा भ्याडपणा आहे. मलाही जगायचे होते, पण जिथे शांती आणि स्वाभिमान नसेल तेथे जगण्याचा काय फायदा आहे. माझी पत्नी कंचन शर्मा आणि तिची आई विनु शर्मा यांनी मला कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी पत्नी तापट स्वभावाची आहे. तिचे व्यक्तिमत्व वेगळे आहे आणि माझे वेगळे आहे. ते एकमेकांशी जुळत नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
संदीप पुढे लिहितो, ‘ दररोजची भांडणे, सकाळ-संध्याकाळ भांडणे, हे सगळं सहन करण्याची माझ्याकडे शक्ती नाही. यात कंचनची चूक आहे. कारण तिचा स्वभाव असा आहे की तिला सर्वकाही नॉर्मल आहे असे वाटते, मात्र माझ्यासाठी सर्वकाही नॉर्मल नाही. मी मुंबई अनेक वर्षांपासून आहे. अतिशय वाईट काळ पण पाहिला आहे, मात्र कधी इतका ढासळलो नाही.’
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times