‘गर्दी अजिबात कमी झालेली नाही. आम्ही फक्त पंजाब आणि हरयाणामध्येच नव्हे तर इतर राज्यातील खेड्यात आणि जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा वाढवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंजाबमध्ये लाट निर्माण करण्यास काही महिने लागले. तर देशात अशा प्रकारचे प्रभाव निर्माण होण्यास थोडा अधिक वेळ लागेल. पण आमच्या आंदोलनाचा वेग कमी झालेला नाही. आमच्या दृष्टीकोनातून हे आंदोलन दिवसेंदिवस मजबूत होत आहे, असं क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे (पंजाब) अवतार सिंग मेहमा म्हणाले.
अनेक शेतकरी घरून परत येत आहेत. ते थोड्या काळासाठी घरी जातात आणि नंतर परत येतात. कारण त्यांना शेतीची कामेही सांभाळावी लागतात. तरीही सीमेवरील आंदोलकांची संख्या स्थिरच आहे. १८ फेब्रुवारीच्या “चक्का जाम” नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं.
“संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या सीमेवर संख्या स्थिर ठेवण्यासाठी रणनीती आखत आहे. यामुळे आंदोलकांना घरकामाचे व्यवस्थापन करता येईल. पण सीमेवर लोकांची संख्या १८ फेब्रुवारी नंतरच वाढेल. लवकरच, आम्ही देशभरातील शेतकऱ्यांनाही दिल्लीतल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहोत, असं मेहमा म्हणाले.
‘जेव्हा मी महापंचायतीसाठी करनालला गेलो होतो, तेव्हा सिंघूमधील अनेक लोक माझ्याबरोबर होते आणि ते पुन्हा परत आले. आम्ही राजस्थानमधील सीकर आणि पूर्व उत्तर प्रदेशातील बर्याच भागातील लोकांना देखील एकत्रित करत आहोत. पण ही तात्पुरती परिस्थिती आहे. १८ फेब्रुवारी नंतर पुन्हा गर्दी होईल, असं भारतीय किसान युनियन एकताचे (दकौदा) सरचिटणीस जगमोहन सिंग म्हणाले.
‘लोकांना महापंचायतीत सहभागी व्हायचे आहे. खासकरुन राकेश टिकैटसारखे नेते सांगत असल्याने ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातात. पण याचा अर्थ असा नाही की ते माघारी जात आहेत. ते फक्त एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात आहेत’, असं बीकेयू (लखोवाल) सरचिटणीस परमजीत सिंग म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times