मुंबई: राज्यात संसर्गाबाबत () चिंतेचे वातावरण आजही कायम असून आजही दिवसभरातील रुग्णवाढीचा विचार करता कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची संख्या तब्बल १ हजार १२४ ने अधिक आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात ३ हजार ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. काल ही संख्या ३ हजार ६६३ इतकी होती. आजची संख्या देखील बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे. (maharashtra reported 4787 new cases and 40 deaths today)

आज राज्यात एकूण ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३९ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके झाले आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७६ हजार ०९३ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here