ऐश्वर्या आणि आराध्याचे एअरपोर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या आराध्याचा हात पकडून चालताना दिसत आहे. तर अभिषेक बच्चन या दोघींच्या मागून चालत आहे. हे फोटो पाहिल्यावर युझर्सनी त्यावर कमेंट केल्या आहे. अखेर कधीपर्यंत ऐश्वर्या अशाप्रकारे आराध्याचा हात धरून चालणार आहे? असा प्रश्न एका युझरनं केला आहे. तर आणखी एका युझरनं लिहिलं, आता ऐश्वर्यानं अशा प्रकारे तिची अती काळजी करणं थांबवायला हवं.
काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती भजन गाताना दिसली होती. आराध्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी आराध्यासोबतच ऐश्वर्या आणि अभिषेकचंही कौतुक केलं होत. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना युझर्सनी यातूनच ऐश्वर्या आणि अभिषेक मुलीला किती चांगले संस्कार देत आहेत हे दिसतं असं लिहिलं होतं.
तसं पाहायला गेलं तर आराध्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ऐश्वर्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा ती यावरून ट्रोल झाली आहे. जेव्हा एका युझरनं अभिषेकला आराध्या शाळेत जात नाही का असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना अभिषेकनं लिहिलं होतं, जास्त करून शाळा या शनिवार-रविवार बंद असतात त्यामुळे आराध्या वीक डे ला शाळेत जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times