जळगाव: राज्यभरात पुन्हा संसर्ग वाढला आहे. राज्य शासनाने केलेल्या चुकांमुळेच करोना ससंर्ग वाढत आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर हे टाळता आले असते, असा आरोप भाजपचे नेते माजी मंत्री यांनी जळगावात केला आहे.

गिरीश महाजन आज सकाळी जळगावात शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके आदींसह भाजप नगरसेवकांची उपस्थिती होती.

वाचा:

यावेळी वाढत्या करोना संसर्गावर बोलताना गिरीश महाजन पुढे म्हणाले, शासनाने योग्य वेळी काही निर्बंध घातले असते तर ही वेळ आलीच नसती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती चिघळेल की काय, अशी शक्यता आहे. त्यामुळे जनतेनेही स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवजयंतीवरच निर्बंध कशाला?

शिवजयंती साजरी करण्याबाबत राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांवर देखील महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. महाजन म्हणाले की, एकीकडे राज्य शासनाचे मंत्री, प्रमुख नियमांची पायमल्ली करत आहेत. दररोज मंत्री मोठ्या रॅली काढत आहेत, हजारोंच्या संख्येने मेळावे घेत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. तुम्ही आपल्या लोकांना आवर घालू शकत नाहीत, मग लोकांवर निर्बंध कशासाठी? करोनाचा प्रादुर्भाव आता वाढत आहे. म्हणून सर्वांना नियम लागू झाले पाहिजेत. मात्र, आज आपल्या जाणत्या राजाची जयंती आहे म्हणून आम्ही नियमांच्या चौकटीत उत्सव साजरा करू, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here