वाचा:
कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असा आग्रह यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे धरला.
वाचा:
आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचे जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
वाचा:
पंतप्रधान मोदी म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत बोलताना राज्य व केंद्र सरकारने एकजुटीने आणि समन्वयाने काम केले पाहिजे, असे नमूद केले. आर्थिक प्रगती साधायची असेल तर सरकारला खासगी क्षेत्राचाही तितकाच आदर करावा लागेल आणि त्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावं लागेल, असेही मोदी म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पाचे झालेले स्वागत म्हणजेच विकासाच्या मार्गावर देशाची वेगाने वाटचाल सुरू असल्याचे संकेत आहेत, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. देशाच्या उभारणीत प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, हेच आपल्या सरकारचे धोरण असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times