चंद्रकांत पाटील यांच्यावर सोडले टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरूनही निशाणा साधला आहे. करोनाचे कारण सांगत राज्य सरकार अधिवेशन लांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना सरकार घाबरत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
करोनाचं कारण पुढे करून संसद होऊ दिली नाही. हे चंद्रकांत दादा विसरले का?, असा सवाल करताना हे देशावर नव्हे तर जगावर आलेल संकट आहे. ते निमित्त नसून संकटच आहे. पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या चंद्रकांतदादांसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे भाष्य करावे हे दुर्देव आहे असे राऊत म्हणाले. आम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नसून आमच्याकजे आज ही १७० चे बहुमत आहे.आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितले होते कीआम्हाला बहुमताची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती म्हणजे करोनाच्या संसर्गाची, असेही राऊत यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
पूजा चव्हाण हे प्रकरण राजकीय आणि भावनिकही
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे केवळ राजकीय नाही. हा राजकीय तसेच भावनिक विषय आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून आम्ही यात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करून तपासात अडथळे आणू इच्छित नाही किंवा दिशाभूल करू इच्छित नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव जोडून टीकेची झोड उठवली आहे. यावर विचारले असता राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणाचा तपास सुरू असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे राऊत म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असून त्यांच्या संवेदनशीलतेवर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times