नवी दिल्लीः येत्या काही महिन्यांत चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ( ) केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे () किमान २५,००० जवान तैनात केले जातील. विधानसभा निवडणुकीसाठी गृह मंत्रालयाने सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ आणि एसएसबीच्या २५० कंपन्या तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. तर ७५ कंपन्यांना राखीव ठेवल्या जातील. आवश्यकता असेल त्या राज्यात या कंपन्या तैनात केल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर्षी एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगाल ( ) , आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये अपेक्षित आहेत.

दरम्यान, बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सीएपीएफच्या १२ कंपन्या शनिवारी पोहोचल्या. दोन कंपन्या रेल्वेने दुर्गापूरला पोहोचल्या, त्यापैकी एक कंपनी बीरभूम आणि एक कंपनी बनकुडा जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. त्याचवेळी एक कंपनी बर्धमानमध्ये पोहोचली आहे.

बंगालमधील सुरक्षेवर विशेष भर

यावर्षी ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी राज्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) तैनात करण्यास सुरवात झाली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची राज्यांमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. पश्चिम बंगालमधील सुरक्षेबाबत निवडणूक आयोग ( ) चिंतेत आणि सतर्क आहे. सीएपीएफच्या १२५ कंपन्यांना बंगालमध्ये पाठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

पाच राज्यांसाठी सीएपीएफ कंपन्या शनिवारी रवाना झाल्या. ४५ कंपन्या तामिळनाडूमध्ये, ४० आसाम (आसाम), १० पुदुच्चेरी आणि ३० केरळमध्ये पाठवल्या जात आहेत. अद्याप या पाच राज्यांपैकी कोणत्याही राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने या राज्यांत निवडणूक अधिकारी तैनात करण्याबाबत आधीच सूचना जारी केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here