शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून केवळ महाराष्ट्रातील भाविक नाहीत तर देशातील अनेक राज्यांमधून भाविक येथे दररोज गर्दी करतात. मंदिरात मोठी गर्दी होत असल्यानेच प्रशासनाने हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी केली महत्वाची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी राज्यातील करोनाच प्रादुर्भाव पाहता राज्यात आज पासून सर्वप्रकारचे गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
क्लिक करा आणि वाचा-
या कार्यक्रमांमध्ये राजकीय सभा, मेळावे, राजकीय मिरवणुका, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक आणि धार्मिक स्वरुपाच्या मिरवणुका आणि यात्रा, जत्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times