वाचा:
विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजकांना विशेष धन्यवाद दिले. कालच मी फेसबुक लाइव्हमधून प्रेमाने आणि हक्काने सूचना दिल्या होत्या. सार्वजनिक कार्यक्रम करू नका, असे मी सांगितले होते. त्यानंतर आज हा पूर्वनियोजित कार्यक्रम आम्ही करत आहोत. केवळ जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित प्रश्न असल्याने मी येथे उपस्थित राहिलोय, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाणी म्हणजेच आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनत आहेत. उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र, पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही. हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू ते. तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, असे होता नये. पाण्याची पातळीही खूप खोल जाते आहे. या सगळ्या बाबी ध्यानात घ्यायला हव्या. मी गेल्याच आठवड्यात जव्हारला गेलो होतो. ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत, पण पाण्याचे दुर्भिक्ष काय असते ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते, असे सांगत निसर्गाचे संवर्धन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
वाचाः
नीती आयोगाच्या बैठकीत मी महत्त्वाचा मुद्दा मांडला. ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत तो करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये, असे मी सांगितले. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे. दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. तो जीवघेणा विकास ठरले. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तर लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी सुविधा देऊन ते उभारावेत, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.
वाचा:
करोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या. सर्व काही बंद होतं. त्या काही महिन्यांत प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे, असे नमूद करतानाच प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत, असा धोक्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील तरीही पिण्याचे पाणी आपण गावागावात घेऊन जाऊ शकलो नाही हे दुर्दैव आहे. मंगळावर पाणी सापडले आहे किंवा नाही हे उत्सुकतेने आपण तपासतो पण त्याअगोदर आपण आपल्याकडे मुलभूत सुविधा आहेत का ते पहावे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुंबईजवळ असलेल्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आपण आता नाही केली तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. म्हणून वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशा शब्दांत आश्वस्त करतानाच रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times