वाशिमः ‘पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचं घाणेरडे राजकारण केलं जात असून ते चुकीचं आणि निराधर आहे. माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशी प्रतिक्रिया वनमंत्री यांनी दिली आहे. जवळपास दोन आठवड्यांनी समोर आल्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळं वादात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज दोन आठवड्यानंतर सार्वजनिकरित्या पुढे आले आहेत. संजय राठोड यांनी आज पूजा चव्हाणच्या आत्महत्येवर पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे.

‘पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मात्र, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जातं आहे. हा प्रकार माझी सामाजिक, राजकीय, आणि वैयक्तिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी केलं आहे.

‘समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे त्यात सर्व स्पष्टचं होईल. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका,’ अशी कळकळीची विनंती संजय राठोड यांनी केली आहे.

गायब नव्हतो

‘मी १५ दिवस गायब नव्हतो मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा,’ असं ते म्हणाले आहेत.

आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका

‘सोशल मीडियावर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राठोड यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. गेली ३० वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात काम केलं आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. एका घटनेमुळं मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका,’ असं आवाहनही राठोड यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here