या मंत्र्याच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. एवढे पुरावे समोर येऊन देखील आणखी काय सिद्ध व्हायचे शिल्लक आहे,असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे?, तसेच राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही? असे सवालही पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
ठाकरे सरकारने कायदा खिशात घातला- पाटील
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली असल्याची टीका त्यांनी केली. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत? महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण तुमच्याकडून अपेक्षित असताना तुम्ही आपल्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत आहात, असा थेट आरोप त्यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जाहीर करत गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही चंद्रकात पाटील यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times