म. टा. प्रतिनिधी,
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजने’ला एक वर्ष पूर्ण झाले, तरीही जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २१५ (Farmers) हे कर्जमुक्तीपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३८ हजार २७९ शेतकऱ्यांना सुमारे एक हजार १५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असले, तरी तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. (About 14 thousand 215 farmers in district were deprived of debt relief)

जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक लाख ५२ हजार ४९४ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी १४ हजार २१५ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर बँकेचा खाते क्रमांक चुकीचा असणे, आधार प्रमाणिकरण न होणे या कारणांमुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यास मार्च २०२० पासून सुरुवात झाली. या योजनेनुसार सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील १४ हजार २१५ शेतकरी हे अद्याप लाभापासून वंचित राहिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

प्रामाणिक शेतकऱ्यांना कोणताच लाभ नाही

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आल्यावर थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. त्यानुसार लाखो शेतकरी हे कर्जमुक्त झाले आहेत. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभ देण्याचे राज्य सरकारकडे जाहीर केले आहे. मात्र, वर्ष झाले, तरी नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळालेला नाही. संबंधित शेतकरी हे लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here