मुंबई: डॉक्टरच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेले सेंट्रल येथील पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. या रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. तीन मृत कर्मचाऱ्यांना जिवंत असल्याचे दाखवत त्यांचे पेन्शन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन लाटण्यात आले. विभागीय चौकशीमध्ये सुमारे दहा लाखाची रक्कम हडप केल्याचे उघडकीस येताच रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वाचा:

मुंबई महापालिकेच्या कोषागार कार्यालयातून नायर रुग्णालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आस्थापना विभागातील चौघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावे आपल्या कार्यालयातून पेन्शनचे दावे मंजूर कसे करण्यात आले? याबाबत या नोटिशीमधून विचारणा करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या या नोटिशीला अधिकाऱ्यांनी उत्तर देतानाच, या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली. त्यावेळी आस्थापना विभागातील कारकून प्रसाद गोसावी हा ऑगस्ट महिन्यात कंकू रावलीया हिचा सेवानिवृत्तीचा अर्ज घेऊन आला होता, हे लक्षात आले. मास्क लावलेली एक महिला प्रसादसोबत यावेळी आली होती. प्रसादने तिची ओळख रावलीया यांची सून अशी करून दिली होती. त्यांनी सादर केलेला बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असलेला हयातीचा दाखला तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती बोगस असल्याचे लक्षात आले. कंकू हिच्याप्रमाणेच आणखी दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे घडल्याचे निदर्शनास आले.

वाचा:

कारकून प्रसाद गोसावी यानेच दिशाभूल केल्याचे विभागीय चौकशीतून समोर आले. आपण अडकले जाऊ या भीतीने गोसावी याने आपली चूक मान्य केली आणि तीन मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटलेले ९ लाख ९१ हजार ७०० रुपये महापालिका को ऑपरेटिव्ह बँकेत जमा केले. असे असले, तरी फसवणूक, शासकीय रकमेचा अपहार आणि बोगस कागदपत्र तयार केल्यामुळे नायर रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून प्रसाद गोसावी याच्यावर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीन कर्मचाऱ्यांना भासविले जिवंत

कंकू रावलीया, निर्मला माघाडे आणि शांताबाई जाधव या तीन महिला कर्मचारी मृत असतानाही त्यांच्या हयातीचा बोगस दाखल तयार करून त्या जिवंत आहेत, असे भासविण्यात आले. बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावाने पेन्शन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून घेण्यात आले.

करोना, मास्कचा गैरफायदा

प्रसाद गोसावी याने बनावट कागदपत्रांसोबतच बोगस नातेवाईकही उभे केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. नायरमधील आस्थापना कार्यालयात अर्ज तसेच इतर कागदपत्रे जमा करताना मृत व्यक्तीचे वारसदार म्हणून त्याने दुसऱ्याच व्यक्तींना उभे केले. विशेष म्हणजे, या कालावधीत करोनाचा संसर्ग प्रचंड वाढला होता. त्यामुळे या बोगस वारसदारांना मास्क घालून अधिकाऱ्यांसमोर त्याने हजर केल्याने नातेवाईकांना ओळखता आले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here