मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ७०२ नवीन बाधितांची भर पडली असून त्यातील १ हजार १४५ रुग्ण मुंबईत आढळल्याने मुंबईची चिंता वाढली आहे. मुंबईत बुधवारी एक हजारावर रुग्ण आढळले होते त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही हजारावर बाधित आढळल्याने मुंबईवरील करोनाचा विखळा पुन्हा एकदा घट्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. ( )

वाचा:

मुंबईत आज १ हजार १४५ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ४६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा आता ११ हजार ४५८ इतका झाला आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून हा आकडा आता ८ हजार ९९७ इतका झाला आहे.

वाचा:

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबईतही प्रादुर्भाव वाढताना दिसत असून सलग दोन दिवस हजारावर नवीन रुग्णांची भर पडल्याने धोका वाढू लागला आहे. बुधवारी मुंबईत १ हजार १६७ रुग्ण आढळले होते. २८ नोव्हेंबर २०२० नंतर गेल्या चार महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ ठरली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेची आरोग्य यंत्रणा व अन्य विभाग सतर्क झाले असून सध्या मुंबईतील १२६ इमारती सील करण्यात आल्या आहेत आणि झोपडपट्टी व चाळीत १३ तयार करण्यात आले आहेत.

वाचा:

जिल्ह्यात दिवसभरात ७३४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात पुन्हा मोठ्या संख्येने करोना रुग्ण वाढू लागले आहेत. गुरुवारी तब्बल ७३४ नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर बाधितांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार इतकी झाली आहे तर दिवसभरात ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत २ लाख ५१ हजार ४५५ वर गेली आहे. सध्या ५ हजार ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज पाच रुग्ण दगावले असून आतापर्यंत ६ हजार २५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या शहरात आज किती रुग्ण वाढले?

ठाणे- २२४, कल्याण-डोंबिवली- २२७, नवी मुंबई- १२२, मिरा-भाईंदर- ६४, उल्हासनगर- १६, भिवंडी- ६, अंबरनाथ- १५, बदलापूर- ३९, ठाणे ग्रामीण- २१

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here