नवी दिल्ली : देशाच्या निवडणूक आयोगाकडून राजधानी दिल्ली स्थित विज्ञान भवनात शुक्रवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या काही दिवसांत , , , ही चार राज्य तर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा हे विधानसभा निवडणुकांसंंबंधी पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हेदेखील या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत.
(अपडेट बातमी वाचण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा)

LIVE अपडेटस् :

– सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं लसीकरण केलं जाईल

– मतदारांच्या सोईसाठी तब्बल २.७ लाख मतदान केंद्र उभारले जातील.

– यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १८ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील

– एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल.

– आम्ही सर्व निवडणूक नियोजित राज्यांचा वारंवार दौरा करून आढावा घेतला

– तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे.

– काळात अनेक कर्मचारी आणि अधिकारी करोना संक्रमणाच्या जाळ्यात सापडली. त्यातून ते बाहेर पडले आणि जबाबदारी निभावली. अशा अनेक करोना वीरांचा राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

– करोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केलं : मुख्य निवडणूक आयुक्त

– करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊनच पाच राज्यांत निवडणुका पार पडतील : सुनील अरोडा

– मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी मेडिकल स्टाफसहीत सर्व करोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

– राज्य : एकूण मतदार संघ

पश्चिम बंगाल : २९४ मतदार संघ

तमिळनाडू : २३४ मतदार संघ

केरळ : १४० मतदार संघ

आसाम : १२६ मतदार संघ

पुदुच्चेरी : ३० मतदार संघ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here