मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. चित्रा वाघ या आवाज उचलच असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्यात येत आहे. त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची खोटीनाटी चित्रे प्रसारित केली जात आहेत. आणि हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.
… तेव्हा संशय निर्माण होतो- मुनगंटीवार
पूजा चव्हाण हिला काही सोन्याच्या भेटवस्तू मिळाल्याचा मुद्दा यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांनी सोन्याची अंगठी देतो, तांब्या-पितळेची नाही. यामुळे संशय निर्माण होतो. याची चौकशी करून हा संशय दूर केला गेला पाहिजे. जर निर्दोष असेल तर कारवाई होता कामा नये आणि तर यात दोषी आढळला तर मात्र कारवाई झाली पाहिजे. मात्र, चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे.
क्लिक करा आणि वाचा-
आम्ही मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो. तसेच विधान भवनात जाताना आम्ही शिवरायांचं दर्शन घेतो आणि विधानभवनात प्रवेश करतो. ते कशासाठी, तर आम्ही महाराजांना विश्वास देतो की तुमच्या या रयतेच्या राज्यात तुम्ही जरी नसलात तरी देखील तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. कोणत्याही महिलेवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर अशा व्यक्तीची अवस्था आम्ही या रयतेच्या राज्यात रांझ्या पाटलाची झाली तशीच करू ही भावना त्या मागे असते, असे सांगत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times