मुंबईः सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, अशी शंका शिवसेनेचे नेते यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून राऊतांनी मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे. ( on )

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काँग्रेसनं तर भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकर यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेनंही डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शंका व्यक्त केली आहे.

वाचाः

‘सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

‘मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

वाचाः

‘मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कड्यावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

वाचाः

बाळासाहेबांनी डेलकरांच्या विरोधात प्रचासभा घेतली होती

१९९० च्या दशकात शिवसेनेने सिल्वासात लोकसभा निवडणूक लढवली. प्रचारासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे सिल्वासाला गेले. मोहन डेलकर काँग्रेसचे उमेदवार होते. प्रचार सभा डेलकरांच्याच विरोधात होती. डेलकरांच्या झुंडशाही आणि दडपशाहीविरोधात शिवसेनेने प्रचार सुरू केला. त्यात बाळासाहेब ठाकरे तेथे पोहोचणार म्हटल्यावर वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आदल्या दिवशी संध्याकाळी फोन वाजला. फोनवर स्वतः मोहन डेलकर. ‘क्या मोहनभाई, क्या चल रहा हैं’ मोहन डेलकर शांतपणे म्हणाले, ‘उद्या सिल्वासात आदरणीय बाळासाहेब येत आहेत. सिल्वासात चांगली हॉटेल्स नाहीत. साहेबांची गैरसोय होऊ नये. त्यांना विनंती करा, माझ्याच बंगल्यात उतरा. नंतर प्रचार सभेला जा. सध्या कडक उन्हाळा आहे.’ यावर मी विचारले, ”अरे बाबा, तुझा पक्ष तुझ्यावर कारवाई करील ‘बाळासाहेबांमुळे कारवाई होणार असेल तर चालू द्या, पण मीच जिंकणार आहे, असं डेलकर म्हणाले व शेवटी डेलकरच मोठ्या फरकाने जिंकले, अशी आठवणही संजय राऊत यांनी सांगितली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here