जिल्हा परिषदेच्या आमसभेत आरोग्य समिती सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावती जिल्ह्यात सक्रिय असल्याचा आरोप केला होता. करोना अहवाल पॉझिटीव्ह हवा अथवा निगेटिव्ह अशी विचारणा केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी सभागृहात केला होता. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी चौकशी सुरू केली होती. साबळे यांनी याबाबत पुरावे देण्याचे म्हटले होते. परंतु चौकशीदरम्यान पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केलेल्या अहवालात करोना रॅकेटच्या आरोप योग्य नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी चौकशी करताना दीडशेहून अधिक करोनाबाधितांशी संवाद साधून चौकशी केली.
अॅन्टीबॉडी टेस्ट महत्वाची ठरणार
साबळे यांनी विम्याचा लाभ घेतलेल्यांची करण्याचे म्हटले आहे. तसे झाल्यास लाभ घेतलेल्यांना खरेच करोना होऊन गेला की नाही हे स्पष्ट होणार आहे. यामुळे ही चाचणी महत्त्वाची ठरणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times