मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्री यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. या प्रकरणात समाजाची बदनामी थांबावी आणि निष्पक्ष चौकशी होऊन खरे सत्य बाहेर पडावे यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया पाहणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात ते पाहा, लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…

Live अपडेट्स…

>> राज्यात पुन्हा करोनाचा धोका वाढू लागला आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे- उद्धव ठाकरे.

>> उद्यापासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे- उद्धव ठाकरे.

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू

>> वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

>> आपल्याला वरिष्ठांचा आशिर्वाद आहे हे माहित असल्याने आणि तसेच असल्याने राठोड यांनी आतापर्यंत राजीनामा दिला नव्हता असे नमूद करतानाच पण आता एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

>> खरे म्हणजे पहिल्याच दिवशी हा राजीनामा दिला गेला पाहिजे होता. कारण ज्या प्रकारचे पुरावे आहेत ते पाहता मंत्रिपदावर राहणे हे चूक होते- देवेंद्र फडणवीस

>> मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आताच दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षानी घाणेरडे राजकारण केले गेले. माझ्या समाजाची बदनामी केली गेली- संजय राठोड

>> यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे. म्हणूनच मी मंत्रिपदापासून बाजूला झालेलो आहे. आता या प्रकरणी योग्य चौकशी होऊन खरे सत्य बाहेर पडावे अशीच आपली भूमिका असल्याचे संजय राठोड म्हणाले.

>> पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपला राजीनामा दिला

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here