मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून कंगनाविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ गीतकार यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगना राणावतला अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले होते. याविषयी आज १ मार्चला सुनावणी होती. मात्र, सुनावणीस गैरहजर राहिल्यानं न्यायालयाकडून कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसंच, २६ मार्चला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कंगनाला बजावण्यात आले आहेत.

वाचाः

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना राणावतनं जावेद अख्तर यांना या प्रकरणात ओढत अनेक गंभीर विधानं केली होती. याबाबत अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून अख्तर यांची बदनामी केल्याच्या आरोपांत तथ्य आढळल्याने कंगनाची अधिक चौकशी करण्याची आवश्यक आहे, असा अहवाल पोलिसांनी सादर केला होता.

वाचाः

काय आहे नेमकं प्रकरण?

कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलीवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलीवूडची वाट लागली आहे. बॉलीवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. ऋतिक रोशन आणि यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला ऋतिक व त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते. कंगनाची बहिण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here