म. टा. विशेष प्रतिनिधी । नागपूर

राजधानी मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्याशी सायबर हल्ल्याचा संबंध नाही. असा हल्ला अशक्य आहे. मंत्री धादांत खोटे बालत असून सर्व कपोलकल्पित असल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांनी केला. याबाबत केंद्राला पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ( On )

वाचा:

नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामागे घातपाताचा संशय असल्याचं बोललं जात होतं. त्यात तथ्य असल्याचं काल सायबर सेलच्या अहवालात म्हटलं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल ही माहिती दिली होती. बावनकुळे यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वाचा:

वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णत: मानवनिर्मित आहे. यात कोणत्याही देशाचा संबंध नाही. कुठलीही शहनिशा न करता ऊर्जामंत्री नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अहवालाच्या आधारे विदेशी शक्तींचा हात असल्याचे जाहीर केले. हे करताना मंत्र्यांनी केंद्र सरकारला कळवले नाही किंवा याबाबत माहिती देखील दिली नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

वाचा:

प्रत्यक्षात वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वी दोन वाहिन्या १० ऑक्टोबर रोजीच बंद होत्या. त्यामुळे १२ तारखेला तिसऱ्या वाहिनीवर भार आल्याने ती बंद पडली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी चवथ्या वाहिनीचा आधार घेतला अनेक ठिकाणी ठिणग्या उडू लागल्या. तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. या सर्व माहितीची नोंद आहे. यात सायबर अटॅकचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारचा अटॅक होऊ शकेल इतकी अत्याधुनिक वा सक्षम वीज यंत्रणा नाही, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here