म. टा. वृत्तसेवा, वाशीम
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे भाजपच्या नेत्यांविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड (रा. गुंडी) यांनी १ मार्च रोजी ही तक्रार केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप नेत्या , आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात ही तक्रार आहे.

वाचाः

या नेत्यांनी पूजा चव्हाणसह तिच्या परिवाराची व बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिस पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतु भाजपचे नेते तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित भाजप नेत्यांसह प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार तपासात ठेवली असून वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here