म. टा. वृत्तसेवा, :

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचा अपघात झाल्याचे भासवत पुंडलिक पाटील या रिक्षाचालकाची त्याच्या पोलिस असलेल्या पत्नीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचे समोर आले आहे. तिने वसई पोलिस ठाण्याचा पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मित्रासोबत हा कट रचला. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या दोघांसह पाच जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय महामार्गावर १७ फेब्रुवारी २०१९ रोजी वाघोबा मंदिर परिसरात ढेकाळे गावच्या हद्दीत गुजरात वहिनीलगत एका रिक्षामध्ये पुंडलिक याचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने वार करत ही हत्या करण्यात आली होती. ही रिक्षा नाल्यात अपघात झाल्यासारखी ठेवण्यात आली होती. मनोर पोलिसांनी तपास सुरू केला असता, ही रिक्षा वसई तालुक्यातील असल्याचे समजले.

रिक्षाचालकाची पत्नी ही वसई पोलिस ठाण्यात कार्यरत असून याच पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याशी तिचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातून तिने पतीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. पाच जणांनी हा कट रचला. महिला पोलिस व तिचा प्रियकर या दोघांनी मिळून पुंडलिक याला मारण्याची सुपारी दिली. इतर तिघांनी रिक्षा प्रवासी म्हणून मनोर येथे ढेकाळे परिसरात पुंडलिकला नेऊन त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस कॉन्स्टेबल विकास वसंत पष्टे (वय ३०), स्नेहल पाटील, स्वप्नील मार्तंड गोवारी, अविनाश भोईर, विशाल पाटील, अशी आरोपींची नावे आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here