मुंबईः उद्योगपती यांच्या घरासमोरील कारमध्ये स्फोटकं सापडल्यानं देशभरात खळबळ माजली होती. विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केला आहेत. तसंच, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अंबानी यांच्या ‘अँटेलिया’ निवासस्थानापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका स्कॉर्पिओमध्ये अडीच किलो जिलेटीनच्या कांड्या, चार गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि मुंबई इंडियन्सच्या बॅगेत धमकीचे पत्र सापडले होते. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारला या मुद्दयावरुन घेरलं आहे. तसंच, २६ फेब्रुवारीला अंबानींच्या घरासमोर एक जिलेटन भरलेली गाडी आणि धमकीचं पत्र सापडलं हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अंबानीच्या घरासमोर त्यादिवशी दोन गाड्या होत्या. त्या दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्यात. ती गाडी जिथं पार्क होती त्याची ओळख पटल्यानंतर सगळ्यात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे आधी पोहचले. त्यानंतर सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तीन दिवसांपूर्वी एका एसपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वाझेंना का काढलं?, हे समजलं नाही?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

त्या गाडीच्या मालकानं म्हटलं आहे की माझी गाडी बंद पडल्यानं मी ओला कॅबनं कॉफर्ड मार्केडला गेले. तिथं ते एका व्यक्तीला भेटले. तो कोणाला भेटला?, असा सवालही केला आहे. ज्याची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमाकांवर अनेक वेळा संवाद झाला. वाझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here