मुंबई: उद्योगपती यांच्या या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह जी स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती, त्या कारच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारावर संशय घेताना याप्रकरणी सुरुवातीला तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले यांचे नाव घेऊन विरोधी पक्षनेते यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून त्यावर वाझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( )

वाचा:

अंबानी यांच्या घराजवळ ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या होत्या, ती कार ठाण्यातील या व्यक्तीची असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपासही सुरू आहे. दरम्यान, आज अचानक मुंब्रा खाडीत मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. यावरून विधानसभेत आवाज उठवत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसुख हिरेन यांची ही गाडी विक्रोळी येथे बंद पडली होती. त्यानंतर तिथून ओलाने ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले ती व्यक्ती कोण होती? ही गाडी अंबानी यांच्या घराजवळ सापडली तेव्हा तिथे स्थानिक पोलिसांच्या आधीही सचिन वाझे कसे पोहचले?, धमकीची चिठ्ठी त्यांनाच कशी मिळाली?, असे प्रश्न उपस्थित करताना मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात ८ जून २०२० पासून अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचे दिसत आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्याचवेळी हा सारा घटनाक्रमक संशयास्पद असून याप्रकरणी एनआयए मार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

वाचा:
फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माध्यमांनी सचिन वाझे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी फडणवीस यांचे आरोप फेटाळत काही बाबींवर प्रकाश टाकला. मनसुख हिरेन प्रकरणाबाबात मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच निघालो आहे, असे वाझे म्हणाले.
मनसुख यांनी तीन दिवसांपूर्वी ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक लेखी तक्रार दिली होती. त्यात पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याने मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले होते. एका पत्रकाराने रात्री उशिरा फोन करून पोलीस तुमच्याकडे संशयित म्हणून पाहत आहेत, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते, असे माझ्या कानावर आले आहे, असे वाझे यांनी सांगितले. तुमचं आणि हिरेन याचं याआधी अनेकदा बोलणं झालं असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे विचारले असता त्यांनी तसं बोलू देत. त्याबाबत तेच तुम्हाला सागू शकतील, असे त्रोटक उत्तर वाझे यांनी दिले.

वाचा:

वाझे सर्वात आधी घटनास्थळी पोहचल्याचा फडणवीसांचा दावाही त्यांनी फेटाळला. ‘मी पहिला घटनास्थळी गेलो नाही. सर्वात आधी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, नंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि त्यांच्या पाठोपाठ क्राइम ब्रॅन्चची टीम तिथे पोहचली. त्यात मी होतो, असे वाझे म्हणाले. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सुरुवातीला वाझे हे तपास अधिकारी होते. वाझे यांनी हिरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्याबाबत विचारले असता त्यांनी कोणताही तपशील दिला नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here