नवी दिल्लीः पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रचारही सुरू केला आहे. अशातच काँग्रेसमधील नाराज नेत्यांचे नेतृत्व करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पक्ष सांगणार त्या ठिकाणी प्रचाराला जाणार, असं गुलाम नबी आझाद ( ) म्हणाले.

जम्मूमध्ये गेल्या महितन्यात काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकजूट दाखवली होती. तर गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तयार आहोत. हे आमचं प्रधान्य आहे. काँग्रेस उमेदवारांना विजयी करायचं आहे. पक्षातील सर्व सहकारी नेत्यांच्या वतीने बोलत असल्याचं गुलाम नबी आझाद म्हणाले.

काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या नेत्यांनी पक्षात संघटनात्मक निवडणुका घेऊन सुधारणा करण्याची मागणी केली होती. तसंच पक्षाला कायम स्वरूपी अध्यक्ष हवा आहे, असंही म्हटलं होतं. या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझादही आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. पण आपण मोदींचे कौतुक केले नाही तर उल्लेख केला होता, असं गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here