जम्मूमध्ये गेल्या महितन्यात काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकजूट दाखवली होती. तर गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तयार आहोत. हे आमचं प्रधान्य आहे. काँग्रेस उमेदवारांना विजयी करायचं आहे. पक्षातील सर्व सहकारी नेत्यांच्या वतीने बोलत असल्याचं गुलाम नबी आझाद म्हणाले.
काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या नेत्यांनी पक्षात संघटनात्मक निवडणुका घेऊन सुधारणा करण्याची मागणी केली होती. तसंच पक्षाला कायम स्वरूपी अध्यक्ष हवा आहे, असंही म्हटलं होतं. या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझादही आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. पण आपण मोदींचे कौतुक केले नाही तर उल्लेख केला होता, असं गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times